Uddhav Thackeray : निवडणूक अधिका-यांनी उद्धव ठाकरेंना बनवले गि-हाईक!

दुसऱ्यांदा बॅग तपासल्याने ठाकरे सैरभैर झाले; दरवेळी मीच का पहिला म्हणत रडकुंडीला आले

लातूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नेत्यांची बॅग तपासण्याची प्रक्रिया कडकपणे राबवली जात आहे, मात्र यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बॅग दुस-यांदा तपासल्याने ते आक्रमक झाले आहेत.


यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या ठाकरेंची हेलिपॅडवर बॅग तपासली गेली. त्यावर ठाकरे संतापले आणि मोदी, शिंदे, फडणवीसांचीही बॅग तपासल्याचे व्हिडिओ मागितले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शूट केला व सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर झाला.


Uddhav Thackeray

त्यानंतर, आता औसा मतदारसंघात पुन्हा त्यांच्या बॅगची तपासणी झाली, ज्यामुळे ठाकरे अधिक संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत, आयडी व अपॉईंटमेंट लेटर दाखवण्यास सांगितले. सर्व काही नियमानुसार असल्याने आणि अधिका-यांच्या तपासणीत कुठेच काही नाव ठेवण्यासारखे न सापडल्याने ते अधिकच चिडले.


औसा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले असताना झालेल्या या घटनेवर ठाकरे काकुळतीला येत म्हणाले की, दरवेळेला हे निवडणूक अधिकारी माझीच तपासणी का करतात. मीच का पहिला गिऱ्हाईक? असे सांगत त्यांनी (Uddhav Thackeray) स्वत:चेच हशे करुन घेतले.


Comments
Add Comment

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद