Assembly election: विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला ६० पेक्षा जास्त जागा, विनोद तावडेंचा विश्वास

  75

सिंधुदुर्ग : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत(Assembly election) मुंबई,ठाण्यासह संपूर्ण कोकणात ६०पेक्षा अधिक जागा ह्या महायुतीला मिळणार आहेत. त्‍यामुळे विधानसभेत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा सुफडा साफ होईल. मुख्यमंत्री पदासाठी किंबहुना सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्‍व सोडले. त्‍याची किंमत त्‍यांना या निवडणुकीतही मोजावी लागेल असे प्रतिपादन भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.


कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात श्री.तावडे यांनी मार्गदर्शन केले. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्‍यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.



श्री.तावडे म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह प्रसारित केले होते. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हा डाव मतदारांनी ओळखला आहे. फक्‍त कोकणपट्ट्यातच महाविकास आघाडीला ६० हून अधिक जागा मिळणार आहेत. तर सिंधुदुर्गात दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या विजयासह आमदार नितेश राणे यांच्या विजयाची हॅट्‍ट्रीक होणार आहे.


ते म्‍हणाले, केंद्राने राज्‍यात अनेक विकास प्रकल्‍प प्रस्तावित केले आहेत. तर राज्‍य शासनाने लाडकी बहीण योजना आणून अनेक महिलांना आधार दिला आहे. मात्र ही योजना चुकीची असल्‍याचे महाविकास आघाडीकडून सांगून मतदारांशी दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.


श्री तावडे म्हणाले याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत(Assembly election) आम्ही शिवसेना-भाजप म्हणून एकत्रित लढलो. बहुमतही गाठले. परंतु, उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. केवळ एका खुर्चीसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ सोडली. दरम्‍यान काँग्रेस पक्षाकडून आम्‍ही घटना बदलणार असे वारंवार सांगितले जात आहे. वस्तुत: यापूर्वी आम्ही बहुमतात दोन वेळा सरकारमध्ये होतो. तेव्हाही घटना बदल करू शकलो असतो. परंतु आम्ही घटना बदलणार नाही आणि ते शक्यही नाही असे ते शेवटी म्हणाले.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी