Assembly election: विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला ६० पेक्षा जास्त जागा, विनोद तावडेंचा विश्वास

  64

सिंधुदुर्ग : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत(Assembly election) मुंबई,ठाण्यासह संपूर्ण कोकणात ६०पेक्षा अधिक जागा ह्या महायुतीला मिळणार आहेत. त्‍यामुळे विधानसभेत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा सुफडा साफ होईल. मुख्यमंत्री पदासाठी किंबहुना सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्‍व सोडले. त्‍याची किंमत त्‍यांना या निवडणुकीतही मोजावी लागेल असे प्रतिपादन भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.


कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यात श्री.तावडे यांनी मार्गदर्शन केले. त्‍यानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्‍यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.



श्री.तावडे म्‍हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह प्रसारित केले होते. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हा डाव मतदारांनी ओळखला आहे. फक्‍त कोकणपट्ट्यातच महाविकास आघाडीला ६० हून अधिक जागा मिळणार आहेत. तर सिंधुदुर्गात दीपक केसरकर, निलेश राणे यांच्या विजयासह आमदार नितेश राणे यांच्या विजयाची हॅट्‍ट्रीक होणार आहे.


ते म्‍हणाले, केंद्राने राज्‍यात अनेक विकास प्रकल्‍प प्रस्तावित केले आहेत. तर राज्‍य शासनाने लाडकी बहीण योजना आणून अनेक महिलांना आधार दिला आहे. मात्र ही योजना चुकीची असल्‍याचे महाविकास आघाडीकडून सांगून मतदारांशी दिशाभूल करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.


श्री तावडे म्हणाले याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत(Assembly election) आम्ही शिवसेना-भाजप म्हणून एकत्रित लढलो. बहुमतही गाठले. परंतु, उध्दव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर चित्र वेगळे दिसले असते. केवळ एका खुर्चीसाठी ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ सोडली. दरम्‍यान काँग्रेस पक्षाकडून आम्‍ही घटना बदलणार असे वारंवार सांगितले जात आहे. वस्तुत: यापूर्वी आम्ही बहुमतात दोन वेळा सरकारमध्ये होतो. तेव्हाही घटना बदल करू शकलो असतो. परंतु आम्ही घटना बदलणार नाही आणि ते शक्यही नाही असे ते शेवटी म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण