श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजापूर बोधचिन्ह निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

  63

धाराशिव: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचेकडून मंदिर संस्थांचे बोधचिन्ह तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या बोधचिन्ह तयार करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण होऊन ते बोधचिन्ह मतदानासाठी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. त्या बोधचिन्हावर (logo) मतदान करण्याचे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह  तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या बोधचिन्हाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबरपर्यंत इमेलवर लोगो सादर करणारे व्यक्ती यांचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगो वोटींगसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या सर्व लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी सर्व बोधचिन्ह (लोगो) मंदिराचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . भाविकांनी मतदान करणेसाठी https://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील होमपेजवर सर्व लोगो वोटींग या लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या