श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तुळजापूर बोधचिन्ह निवडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन

धाराशिव: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचेकडून मंदिर संस्थांचे बोधचिन्ह तयार करण्यासाठी क्रिएटिव्ह डिझाईन मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष या बोधचिन्ह तयार करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण होऊन ते बोधचिन्ह मतदानासाठी मंदिर संस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले होते. त्या बोधचिन्हावर (logo) मतदान करण्याचे आवाहन तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे बोधचिन्ह  तयार करण्यासाठी मागवण्यात आलेल्या बोधचिन्हाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीसोबतच संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या ईओआयनुसार २३ सप्टेंबरपर्यंत इमेलवर लोगो सादर करणारे व्यक्ती यांचे लोगो विचारात घेऊन त्यानुसार सर्व लोगो वोटींगसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. या सर्व लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी सर्व बोधचिन्ह (लोगो) मंदिराचे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत . भाविकांनी मतदान करणेसाठी https://shrituljabhavanitempletrust.org या संकेतस्थळावरील होमपेजवर सर्व लोगो वोटींग या लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून पसंत असलेल्या लोगोसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मतदान करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत