Thursday, May 22, 2025

विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतर देशांतील विद्यार्थी चिंतेत

कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतर देशांतील विद्यार्थी चिंतेत

ओटावा: कॅनडा सरकार स्थलांतरितांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतरही देशांतील विद्यार्थ्यांना चिंतेते टाकले आहे. कॅनडाने त्यांचा लोकप्रिय स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS) कार्यक्रम तात्काळ बंद केला आहे. या निर्णयामुळे हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ करण्यात मदत होणारी फास्ट ट्रॅक व्हिसा प्रक्रिया बंद झाली आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे भारतासह इतर देशांतील विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.



इमिग्रेशन, रिफ्युजीज अँड सिटिझनशिप कॅनडा (आयआरसीसी) च्या सूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, कॅनडाचे उद्दिष्ट कार्यक्रमाची अखंडता मजबूत करणे, विद्यार्थ्यांच्या असुरक्षा दूर करणे आणि सर्व विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत समान आणि न्याय्य प्रवेश देणे आहे. सर्व स्टडी परमिट अर्ज आता मानक अर्ज प्रक्रियेचा वापर करून सबमिट केले जातील.

Comments
Add Comment