Mumbai Pune Highway : भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला जोरदार धडक

  100

१५ प्रवाशी जखमी, ८ जण गंभीर


मुंबई : पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील ८ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती चिताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश, कोकण रेल्वेच्या रो - रो कार सेवेला नांदगावात थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय संघर्ष समितीने देखील वेधले होते लक्ष मुंबईकर चाकरमान्यांसाठी दिलासादायक