Mumbai Pune Highway : भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला जोरदार धडक

  104

१५ प्रवाशी जखमी, ८ जण गंभीर


मुंबई : पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील ८ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती चिताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के