Alandi Yatra 2024 : आळंदीत १५० वर्षे जुन्या रथातून होणार माउलींचा रथोत्सव!

  362

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे (Dnyaneshwar Maharaj) जन्मोत्सव सप्त शतकोत्तर वर्ष (७५० वे वर्षे) सुरू असून त्यानिमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आळंदी (Alandi Yatra) देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून आळंदी देवस्थानने भाविकांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी चांदीच्या रथातून होत असणारा हा रथोत्सव यंदा १५० वर्षे जुना लाकडी रथातून होणार आहे.


तब्बल २३ फूट उंच आणि अंदाजे १ हजार २०० किलो वजन असलेल्या या रथातून माउलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडणार आहे. सध्या देवस्थानकडून रथाची डागडुजी व रस्त्यावर चालण्याचा सराव सुरू आहे. यामुळे ज्या रथातून रथोत्सव सुरू करण्यात आला अशा मूळ लाकडी रथातून यंदाचा रथोत्सव पाहण्याचे साक्षीदार भाविक ठरणार आहेत. ही अनोखी पर्वणी असून, याचे स्वागत आळंदीसह राज्यभरातील भाविकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.



लाकडी रथाचे वैशिष्टय 


इ.स. १८७३ मध्ये श्रीगुरू नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आले. इ.स.१८८६ ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली. आपल्या ११ वर्षे आळंदीतील कार्यकाळात त्यांनी माऊलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले. माउलींच्या कार्तिकी उत्सवात रथोत्सव त्यांनी सुरू केला. त्यासाठी सुरेख नक्षीकाम असलेला शिसम लाकडाचा भव्य रथ त्यांनी माऊलींसाठी बनविला. त्यातून पुढील काही दशके रथोत्सव या रथातून सुरू होता. मात्र, तत्कालीन रस्त्यांची अवस्था आणि रथाची भव्यता पाहता पुढे देवस्थानने हजेरी श्रीमारुती मंदिर चौकात भव्य रथ उभारणी मंडप बांधला व त्यात हा रथ अनेक वर्षे ठेवण्यात आला.


अलीकडे काही वर्षांपूर्वी तेथील मंडप पाडून हा रथ आळंदी-वडगाव रस्ता येथील विश्रांत वड या देवस्थानच्या बागेत भाविकांना पाहण्यासाठी संवर्धित करत ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता हा रथ यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यात रथोत्सवासाठी बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून याबाबतची तयारीही सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या