CM Eknath Shinde : उध्दव ठाकरेंची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बोचरी टीका


सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील उमेदवारांच्या जंगीसभा होत आहेत. अशातच आज सोलापूर येथे परांडा विधानसभेचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मशाल क्रांतीची नसून घराघरात आग लावणारी आहे, अशी बोचरी टीका केली.



दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदे


बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी विकून टाकला असता. बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचे धाडस केले, त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. आम्हीच शिवसेना वाचवली आहे. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण-बान-शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघून दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊदेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला