Ajit Pawar : लाडकी बहीणचे पैसे २१०० रुपये करणार, दादांनी जाहीरनाम्यात केला नवा वादा

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.




लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार


पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जाहीरनामा प्रसिध्द करताना म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. काही बदल करणाऱ्या योजना आम्ही मागच्या ४ महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असणार आहे. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला २५ लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. ९८६१७१७१७१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. तालुका स्तरीय जाहीरनामा यावर ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही २१०० रुपये करणार आहोत. २ कोटी ३० लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.



आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार


आम्ही शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये करणार आहोत. कर्जमाफी आणि अतिरिक्त अनुदान आम्ही देणार आहोत. २० टक्के अधिक अनुदान असेल. राज्यातल्या ग्रामीण भागात ४५ हजार पानंद रस्ते करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे.




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीरनाम्यात काय आहे?


लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना १५०० हजर नाही तर तब्बल २१०० रुपये देण्यात येणार आहे.


महिला सुरक्षेसाठी सोबत २५ हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे.


धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ग्रामीण भागात ४५००० पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा करण्यात आलेला आहे.


अजित दादांच्या पक्षाकडून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी वरती २०% अनुदान देण्याचा वादा करण्यात आलेला आहे.


वीज बिलात ३० % कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे.


वृद्ध पेन्शन धारकांना आता १५०० वरुण महिन्याला २१०० रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.


दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला १०,००० रुपये विद्यावेतनाचा वादा करण्यात आलेला आहे.


२५ लाख रोजगार निर्मितीचा वादा देखील केला आहे.



Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य