Ladaki Bahin Yojana : ‘…तर लाडक्या बहिणी लाटणे घेऊन मागे लागतील’

छगन भुजबळ असे का म्हणाले


नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti) यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) महिलांकरीता अंमलात आणली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातत. या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ही योजना निवडणुकीपुरती असून निवडणुकीनंतर ही योजना महायुती सरकार बंद करेल, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.


छगन भुजबळ यांची आज येवल्यात सभा झाली. या सभेत बोलतांना ते म्हणाले, महायुती सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. महिलांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले. वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावावे, हा निर्णय देखील महायुतीचा आहे, असे भुजबळ म्हणाले.


पुढे ते म्हणाले, हिंदु धर्मात विद्येची देवता सरस्वती आहे. पण मुलींना शिकवले जात नाही. शौर्याची देवता आईभवानी आहे, पण महिलांना बाहेर पडू दिले जात नाही. संपत्तीची देवता लक्ष्मी देवी आहे, पण घरातल्या लक्ष्मीच्या हातात साधे दहा रुपये देखील दिले जात नाही. मात्र, महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. आजवर २ कोटी ७० लाख भगिंनींना पैसे दिले. एवढचं नाही तर कालच मुख्यमंत्र्यांनी, या योजनेत आणखी वाढ करू, असे सांगितले आहे.


मात्र, आमचे विरोधक म्हणतात महायुती सरकार सत्तेवर आले तर योजना बंद करणार. आम्ही ही योजना चालू केली. त्यात १५०० चे २१०० करणार आहोत. योजना बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि समजा आता जर ही योजना बंद केली तर २ कोटी ७० लाख महिला लाटणं हातात घेऊन बाहेर पडल्या तर आमचा एकतरी माणूस बाहेर पडेल का, असा सवाल भुजबळांनी केला आणि एकच हास्यकल्लोळ झाला.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती