राष्ट्रीय एकता दिनी गुजरातमध्ये झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींची मराठीतून प्रतिक्रिया

गुजरात : गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा ऐतिहासिक दुर्ग... मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेल्या या रायगडाची ख्याती अख्या जगभर आहे. रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त होताना म्हंटल आहे. आज ३१ ऑक्टोबर, राष्ट्रीय एकता दिन हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मराठीमध्ये पोस्ट करत म्हटलंय की, रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचं स्थान दिले गेले याचा मला खूप आनंद आहे.







दरम्यान, नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना केवडिया येथे अभिवादन केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारताच्या निर्मितीला विकास आणि विश्वासाची एकता विकसित चालना देते. प्रत्येक योजना, धोरण आणि हेतूमध्ये असलेली एकता ही आपली शक्ती आहे. हे पाहून सरदार वल्लभभाई पटेलांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असेल. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी गेल्या १० वर्षांचा कालावधी अभूतपूर्व कामगिरीने भरलेला राहिला आहे. आज सरकारच्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक कार्यात राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी दिसून येते.


Comments
Add Comment

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)

Deepika Padukone : दीपिकाची AI मध्ये 'व्हॉइस' एन्ट्री! 'Chat Soon' म्हणत अभिनेत्रीने मिळवला जागतिक प्लॅटफॉर्मवर खास स्थान

सहा देशांसाठी दीपिका पदुकोण बनली इंग्रजी व्हॉइस बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने

पंतप्रधान मोदी १३ हजार ४३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते १३ हजार ४३० कोटी

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक