राष्ट्रीय एकता दिनी गुजरातमध्ये झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींची मराठीतून प्रतिक्रिया

गुजरात : गुजरातमधील केवडिया येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा ऐतिहासिक दुर्ग... मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेल्या या रायगडाची ख्याती अख्या जगभर आहे. रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त होताना म्हंटल आहे. आज ३१ ऑक्टोबर, राष्ट्रीय एकता दिन हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मराठीमध्ये पोस्ट करत म्हटलंय की, रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचं स्थान दिले गेले याचा मला खूप आनंद आहे.







दरम्यान, नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना केवडिया येथे अभिवादन केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारताच्या निर्मितीला विकास आणि विश्वासाची एकता विकसित चालना देते. प्रत्येक योजना, धोरण आणि हेतूमध्ये असलेली एकता ही आपली शक्ती आहे. हे पाहून सरदार वल्लभभाई पटेलांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असेल. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी गेल्या १० वर्षांचा कालावधी अभूतपूर्व कामगिरीने भरलेला राहिला आहे. आज सरकारच्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक कार्यात राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी दिसून येते.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च