PMJAY : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ज्येष्ठांना दिवाळी गिफ्ट, ५ लाखांपर्यंत… दरवर्षी मिळणार लाभ

नवी दिल्ली : देशातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली. देशातील ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या जेष्ठांना नरेंद्र मोदी यांनी दिवाळीची भेट दिली. मोदी यांनी आयुष्मान योजनाचा नवीन टप्पा आयुष्मान भारत “निरामयम” योजना सुरु केली. दिल्लीमधील ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) मध्ये आयोजित कार्यक्रमात १२ हजार ८५० कोटी रुपयांची ही योजना लागू केली. आता ७० वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणारे सर्व वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या सर्वांचा आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहे. पाच लाखांपर्यंतच्या विमा योजनेचा लाभ दरवर्षी मिळणार आहे.



काय आहे ही योजना


आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) या योजनेत ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी आहे. उत्पन्नाची त्यासाठी कोणतीही अट नाही. या योजनेचा लाभ कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला मिळणार आहे.


तसेच जे परिवार या योजनेचा आधीपासून लाभ घेत आहे, त्या परिवारातील वृद्ध सदस्यांसाठी वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतचे स्वतंत्र उपचार उपलब्ध असणार आहेत. त्याचा फायदा देशातील सुमारे ४.५ कोटी कुटुंबांतील ६ कोटींहून अधिक वृद्धांना होणार आहे. या योजनेत आत्तापर्यंत केवळ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांचा समावेश होता. मात्र, या योजनेत वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही.




असा मिळणार योजनेचा लाभ


वृद्ध व्यक्तींना या योजनेत आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. ज्या कुटुंबाला आयुष्यमान योजना अजून लागू झालेली नाही त्यांना स्पेशल कार्ड २९ ऑक्टोंबरपासून मिळणार आहे. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ज्येष्ठ सदस्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान कार्ड दिले. आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ किंवा आयुष्मान ॲपद्वारे मिळेल. त्यासाठी वृद्धांना त्यांचं आधार कार्ड आणि केवायसी देखील अपडेट करावे लागेल. ज्या वृद्धांकडे खाजगी आरोग्य विमा असेल त्यांना खाजगी आणि आयुष्मान भारत योजना विमा यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात