मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणसंग्रामात सर्व राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. मात्र अशातच भाजपाला (BJP) मुंबईतून धक्का बसला आहे. भाजपा पक्षामधील दोन नेत्यांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे भाजपा नेते गोपाळ शेट्टी (Gopal shetty) आणि अतुल शाह (Atul Shah) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.
गोपाळ शेट्टी हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रही होते. मात्र भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर मुंबादेवी मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला गेली असून याठिकाणी भाजपाच्या नेत्या शायना एन. सी. यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले भाजपा नेते अतुल शाह हे देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…