जनतेची सेवा करायची आहे ; विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे : निलेश राणे

  54

कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ-२६९ मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. यावेळी खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांसह उपस्थित नेतेमंडळी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आमच्या सोबत जनता आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला प्राधान्य राहील. गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ओसाड होता. आपल्या भूमीची आपल्या जनतेची जी हेळसांड झाली. त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज झालो आहे.


मी कोणावर टीका करणार नाही. जनतेची सेवा हेच लक्ष राहील. यापूर्वी जनतेने २८ व्या वर्षी खासदार बनवले. आता विधासभेसाठी पहिल्यांदा अर्ज भरणा करतोय. या मातीने येथील जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले. त्या जनतेची सेवा करायची आहे. जनतेला गृहीत धरणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने मोठे मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न राहील. कुडाळ-मालवण सोबत सिंधुदुर्ग पर्यायाने महाराष्ट्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. नारायण राणे , पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, रिपाई नेते आणि सर्व महायुती पदाधिकारी यांचे निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.


राजकारणात सक्रिय झाल्यापासूनचं काम माय-बाप जनतेसमोर स्पष्ट आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुडाळ - मालवण मतदारसंघातील एक ही मत आपण आता वाया जाऊ देणार नाही, आपली भूमी पुन्हा भ्रष्टांच्या हाती जाऊ देणार नाही. - निलेश राणे

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण