Reliance Jio : जिओचा दिवाळी-धमाका! ६९९ रुपयांत मिळेल ‘जिओभारत’ ४जी फोन

मुंबई: देशभरात दिवाळीच सण एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच अधिकतर कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देत आहेत. यातच रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही जबरदस्त दिवाळी ऑफर सादर केली आहे. यामुळे लोक आता जिओचा फोन ७०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात.



जिओची दिवाळी ऑफर


दिवाळीला रिलायन्स जिओ जिओभारत फोनवर ३० टक्क्यांची सूट देत आहे. यानंतर आता ९९९ रूपयांना मिळणार जिओभारत फोन केवळ ६९९ रूपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सोबतच जिओ भारत फोनला १२३ रूपयांमध्येही रिचार्ज करता येते. या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलसोबत १४ जीबी डेटाही मिळतो. हा महिन्याचा रिचार्ज प्लान आहे.


रिलायन्स जिओचा १२३ रूपयांचा रिचार्ज प्लान एअरटेल आणि वोडाफोनच्या रिचार्ज प्लान्सच्या तुलनेत साधारण ४० टक्के स्वस्त आहे. तर रिलायन्स जिओच्या या फोनसोबत तुम्ही २ जी ते ४जीमध्ये शिफ्ट होण्याची संधी मिळते.



फोनमध्ये जबरदस्त फीचर्स


फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ४५५ पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात. सोबतच या फोनमध्ये मूव्ही प्रीमियर आणि नवे सिनेमे, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, डिजीटल पेमेंटसारखे फीचर्स मिळतात. सोबतच फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचीही सुविधा मिळते. इतकंच नव्हे हा फोन जिओ पे आणि जिओ चॅटसारख्या प्रीलोडेड अॅप्सनाही सपोर्ट करतो.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या