Reliance Jio : जिओचा दिवाळी-धमाका! ६९९ रुपयांत मिळेल ‘जिओभारत’ ४जी फोन

मुंबई: देशभरात दिवाळीच सण एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच अधिकतर कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देत आहेत. यातच रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही जबरदस्त दिवाळी ऑफर सादर केली आहे. यामुळे लोक आता जिओचा फोन ७०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात.



जिओची दिवाळी ऑफर


दिवाळीला रिलायन्स जिओ जिओभारत फोनवर ३० टक्क्यांची सूट देत आहे. यानंतर आता ९९९ रूपयांना मिळणार जिओभारत फोन केवळ ६९९ रूपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सोबतच जिओ भारत फोनला १२३ रूपयांमध्येही रिचार्ज करता येते. या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलसोबत १४ जीबी डेटाही मिळतो. हा महिन्याचा रिचार्ज प्लान आहे.


रिलायन्स जिओचा १२३ रूपयांचा रिचार्ज प्लान एअरटेल आणि वोडाफोनच्या रिचार्ज प्लान्सच्या तुलनेत साधारण ४० टक्के स्वस्त आहे. तर रिलायन्स जिओच्या या फोनसोबत तुम्ही २ जी ते ४जीमध्ये शिफ्ट होण्याची संधी मिळते.



फोनमध्ये जबरदस्त फीचर्स


फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ४५५ पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात. सोबतच या फोनमध्ये मूव्ही प्रीमियर आणि नवे सिनेमे, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, डिजीटल पेमेंटसारखे फीचर्स मिळतात. सोबतच फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचीही सुविधा मिळते. इतकंच नव्हे हा फोन जिओ पे आणि जिओ चॅटसारख्या प्रीलोडेड अॅप्सनाही सपोर्ट करतो.

Comments
Add Comment

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर