Reliance Jio : जिओचा दिवाळी-धमाका! ६९९ रुपयांत मिळेल ‘जिओभारत’ ४जी फोन

  133

मुंबई: देशभरात दिवाळीच सण एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच अधिकतर कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देत आहेत. यातच रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही जबरदस्त दिवाळी ऑफर सादर केली आहे. यामुळे लोक आता जिओचा फोन ७०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात.



जिओची दिवाळी ऑफर


दिवाळीला रिलायन्स जिओ जिओभारत फोनवर ३० टक्क्यांची सूट देत आहे. यानंतर आता ९९९ रूपयांना मिळणार जिओभारत फोन केवळ ६९९ रूपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सोबतच जिओ भारत फोनला १२३ रूपयांमध्येही रिचार्ज करता येते. या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलसोबत १४ जीबी डेटाही मिळतो. हा महिन्याचा रिचार्ज प्लान आहे.


रिलायन्स जिओचा १२३ रूपयांचा रिचार्ज प्लान एअरटेल आणि वोडाफोनच्या रिचार्ज प्लान्सच्या तुलनेत साधारण ४० टक्के स्वस्त आहे. तर रिलायन्स जिओच्या या फोनसोबत तुम्ही २ जी ते ४जीमध्ये शिफ्ट होण्याची संधी मिळते.



फोनमध्ये जबरदस्त फीचर्स


फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ४५५ पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात. सोबतच या फोनमध्ये मूव्ही प्रीमियर आणि नवे सिनेमे, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, डिजीटल पेमेंटसारखे फीचर्स मिळतात. सोबतच फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचीही सुविधा मिळते. इतकंच नव्हे हा फोन जिओ पे आणि जिओ चॅटसारख्या प्रीलोडेड अॅप्सनाही सपोर्ट करतो.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण