Rahul Gandhi : जागा वाटपावर राहुल गांधींना प्रचंड राग! CECच्या बैठकीतून घेतला काढता पाय

  286

नवी दिल्ली : विधानसभेचा रणसंग्राम (Assembly Election 2024) सुरु झाला असून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सर्व प्रमुख नेते जोर लावताना दिसत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या जागावाटप जाहीर होत आहेत. मात्र मविआच्या जागावाटपाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजीचा सूर मारला आहे.


मविआच्या (MVA) जागावाटपाबाबत दिल्लीमध्ये काल झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत (CEC Meeting) अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. यामध्ये विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा उबाठा गटाला दिल्यामुळे राहुल गांधींना प्रचंड राग आला. 'काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत', अशा शब्दांत राहुल गांधींनी मत व्यक्त करुन त्यांनी सुरु बैठकीतून काढता पाय घेतला.


दरम्यान, राहुल गांधी बैठकीतून गेल्यानंतरही पुढे तासभर मीटिंग सुरू होती. मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आग्रहामुळे काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या. महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर राहुल गांधी यांनी आक्षेप व्यक्त केला.

Comments
Add Comment

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार उसळले! दोन दिवसांच्या घसरणीला 'या' ट्रिगरचा 'स्पीडब्रेकर'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने दोन दिवसांच्या घसरणीला 'स्पीडब्रेकर' लावण्याचे काम केले आहे.

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

टाटा इन्व्हेसमेंट लिमिटेडकडून Stocks Splits जाहीर शेअर 'या' निकालामुळे उसळला !

प्रतिनिधी: टाटा समूहाच्या कंपनीपैकी एक टाटा इव्हेंसमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत