वारकरी मतदानाला मुकणार; कार्तिकी यात्रेसाठी लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर

  94

मुंबई : संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा अर्थात कार्तिकी यात्रा ही कार्तिक वद्य अष्टमी दि. २३ नोव्हेंबर ते अमावास्या दि. १ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी आळंदीच्या वाटेवर असणार आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला लाखो वारकरी मुकणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.


अष्टमीला गुरुवर्य हैबतबाबा पायरीपूजनाने कार्तिक यात्रेला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दिंड्या सुमारे १० दिवस ते १५ दिवस अगोदरच आपल्या गावावरून निघत असतात. विशेषतः मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या लवकर प्रस्थान करत असतात. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवशी शेकडो दिंड्यांतील लाखो वारकरी आळंदीकडे येत असतील. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना आपल्या हक्काच्या मतांवर पाणी सोडावे लागणार आहे.


दिंड्यांचे प्रस्थान परंपरेनुसार तिथीनुसार होत असते, त्यात बदल होत नाही. त्यामुळे वारकरी मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदानाच्या टक्केवारीत घट होणार आहे. एकंदरीत, राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना राज्यातील सर्वांत मोठी भरणारी आळंदीतील कार्तिकी यात्रा लक्षात घेतली की नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.



असा असणार दिंड्यांचा प्रवास


कार्तिकी यात्रेच्या आठवडाभरापूर्वी म्हणजे दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान दिनांकापूर्वी निघालेल्या मराठवाड्यातील दिंड्या सप्तमीला दि. २२ नोव्हेंबर रोजी आणि पंढरपूरच्या दिंड्या अष्टमीला दि. २३ नोव्हेंबरला आळंदीत पोहचतील. तर, नवमी दि. २४ आणि दशमी दि. २५ नोव्हेंबरला मुंबई परिसरातील दिंड्या येतील. या सर्व दिंड्या मतदानादिवशी वाटेत असणार आहेत, तर संत नामदेवराय आणि पांडुरंग पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथे मुक्कामी असणार आहे.


यंदा २० नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक वद्य पंचमीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या तिथीला माउलींच्या समाधी उत्सवासाठी महाराष्ट्रातील सर्वच भागांतून साधारण ५० पालख्या तसेच जवळपास ४०० ते ५०० दिंड्या आळंदीकडे येत असतात. यातील जवळपास लाखभर वारकरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील, अशी शक्यता दिसून येत आहे. - रामभाऊ चोपदार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, आळंदी

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या