Bhool Bhulaiyaa 3 : आमी जे तोमार ३.० गाणं रिलीज! यंदा मंजुलिकासोबत दिसणार या अभिनेत्रीची जुगलबंदी

मुंबई : भूल भुलैया चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यामधील 'आमी जे तोमार' या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच घर केले आहे. अजूनही या गाण्याने चाहत्यांच्या मनात रुंजी घातली आहे. आता लवकरच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपट चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता 'आमी जे तोमार ३.०' हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मात्र या गाण्यात विद्या बालन या मंजुलिकेसोबत आणखी प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा दिसणार आहे.


भूल भुलैय्या ३ या चित्रपटातील आमी जे तोमार ३.० गाणं लाँच झालं असून गाण्याची एक झलक समोर आली आहे. या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत. यामध्ये विद्या पहिली तर माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवले आहे. त्यामुळे यंदा विद्या आणि माधुरीची भन्नाट जुगलबंदीही पाहायला मिळत आहे. ''बंद दरवाजाच्या पलिकडे नक्की काय रहस्य दडलंय'' असं लिहत हे गाणं लाँच करण्यात आले आहे.


दरम्यान, भुल भुलैया ३ चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय विजय राज, राजपाल यादव आणि संजय मिश्रा हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.


Comments
Add Comment

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding : भरजरी साडीत नववधू समंथा! अभिनेत्री समंथा प्रभूनं निर्माते राज निदिमोरूंसोबत गुपचूप उरकलं दुसरं लग्न; फोटो सोशल मीडियावर शेअर

साऊथची लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने चाहत्यांना मोठा धक्का देत गुपचूप दुसरं लग्न

विपुल अमृतलाल शाह यांनी लाँच केलं नवं म्युझिक लेबल, सिद्धिविनायक मंदिरात ‘शुभारंभ’ गाण्याचं उद्घाटन!

विपुल अमृतलाल शाह यांचं नवं म्युझिक लेबल लाँच झालं असून पहिलं गाणं ‘शुभारंभ’ सिद्धिविनायक मंदिरात रिलीज

Bharti Singh Maternity Photoshoot .... भारती सिंगचा मॅटर्निटी बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट

मुंबई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या

ईशा केसकरच्या एक्झिटनंतर महिनाभरातच संपणार 'लक्ष्मीच्या पावलांनी'? नव्या मालिकेची घोषणा अन् वेळही तीच!

मुंबई : ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेमध्ये ईशा केसकरच्या अचानक एक्झिटनंतर कथा मोठ्या वळणावर आली होती. तिच्या

"मोबाईल हातात असला की उंदरासारखे... " जया बच्चन यांची पापाराझींबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पापाराझींवर आपला कठोर सूर कायम ठेवला आहे. एका

सुरज चव्हाणच्या लग्नात गोंधळ, “सगळ्यांची डोकी फिरली आहेत” म्हणत जान्हवी किल्लेकरने घेतली माईकची जबाबदारी

मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा विवाहसोहळा पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली