IND vs NZ: भारतीय संघाची अग्निपरीक्षा, आज फ्लॉप ठरले तर...

  53

मुंबई: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये खेळवला जात आहे. सामन्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे. जर आज भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले तर दुसरा कसोटी सामना आणि मालिका दोन्ही गमावण्याची भीती आहे.


खरंतर, पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सर्व १० विकेट स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी मिळवले. ऑफ स्पिनर सुंदरने ५९ धावा देत सर्वाधिक ७ विकेट घेतल्या तर अश्विनने ६४ धावांमध्ये ३ विकेट आपल्या नावे केले.



भारतीय संघाला घ्यावी लागेल मजबूत आघाडी


यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात बॅटिंग करण्यासाठी उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ विकेट गमावत १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला खातेही खोलता आले नाही. यशस्वी जायसवाल ६ आणि शुभमन गिल १० धावा करून नाबाद राहिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ आज सुरू होत आहे.


भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप २४३ धावांनी पिछाडीवर आहे. जर त्यांना या सामन्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुण्याची ही पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर आहे.


सोबतच संघाला चौथ्या डावातही फलंदाजी करावी लागेल. अशातच रोहित ब्रिगेडला कमीत कमी १५० धावांची आघाडी घ्यावीच लागेल. याची सर्व जबाबदारी विराट कोहली, शुभमन गिल, सर्फराज खान, ऋषभ पंत, आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. जर भारतीय संघ २५९ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला तर न्यूझीलंडकडे सामना आणि मालिका जिंकण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार