IND vs NZ: भारतीय संघाची अग्निपरीक्षा, आज फ्लॉप ठरले तर...

मुंबई: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये खेळवला जात आहे. सामन्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे. जर आज भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले तर दुसरा कसोटी सामना आणि मालिका दोन्ही गमावण्याची भीती आहे.


खरंतर, पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सर्व १० विकेट स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी मिळवले. ऑफ स्पिनर सुंदरने ५९ धावा देत सर्वाधिक ७ विकेट घेतल्या तर अश्विनने ६४ धावांमध्ये ३ विकेट आपल्या नावे केले.



भारतीय संघाला घ्यावी लागेल मजबूत आघाडी


यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात बॅटिंग करण्यासाठी उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ विकेट गमावत १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला खातेही खोलता आले नाही. यशस्वी जायसवाल ६ आणि शुभमन गिल १० धावा करून नाबाद राहिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ आज सुरू होत आहे.


भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप २४३ धावांनी पिछाडीवर आहे. जर त्यांना या सामन्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुण्याची ही पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर आहे.


सोबतच संघाला चौथ्या डावातही फलंदाजी करावी लागेल. अशातच रोहित ब्रिगेडला कमीत कमी १५० धावांची आघाडी घ्यावीच लागेल. याची सर्व जबाबदारी विराट कोहली, शुभमन गिल, सर्फराज खान, ऋषभ पंत, आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. जर भारतीय संघ २५९ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला तर न्यूझीलंडकडे सामना आणि मालिका जिंकण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस