IND vs NZ: भारतीय संघाची अग्निपरीक्षा, आज फ्लॉप ठरले तर...

मुंबई: भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये खेळवला जात आहे. सामन्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असणार आहे. जर आज भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले तर दुसरा कसोटी सामना आणि मालिका दोन्ही गमावण्याची भीती आहे.


खरंतर, पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिला. सर्व १० विकेट स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी मिळवले. ऑफ स्पिनर सुंदरने ५९ धावा देत सर्वाधिक ७ विकेट घेतल्या तर अश्विनने ६४ धावांमध्ये ३ विकेट आपल्या नावे केले.



भारतीय संघाला घ्यावी लागेल मजबूत आघाडी


यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात बॅटिंग करण्यासाठी उतरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ विकेट गमावत १६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माला खातेही खोलता आले नाही. यशस्वी जायसवाल ६ आणि शुभमन गिल १० धावा करून नाबाद राहिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ आज सुरू होत आहे.


भारतीय संघ पहिल्या डावात अद्याप २४३ धावांनी पिछाडीवर आहे. जर त्यांना या सामन्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुण्याची ही पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर आहे.


सोबतच संघाला चौथ्या डावातही फलंदाजी करावी लागेल. अशातच रोहित ब्रिगेडला कमीत कमी १५० धावांची आघाडी घ्यावीच लागेल. याची सर्व जबाबदारी विराट कोहली, शुभमन गिल, सर्फराज खान, ऋषभ पंत, आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल. जर भारतीय संघ २५९ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला तर न्यूझीलंडकडे सामना आणि मालिका जिंकण्याची संधी आहे.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.