Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन; तिघांना अटक!

  91

पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट पुण्यात कर्वेनगर भागात रचण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या खून प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी तिघांना काल रात्री ताब्यात घेतले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलीस कडक तपास करत आहेत.



आरोपींची नावे


यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ आणि रियान खान अशी आहेत.  तसेच पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला दुजोरा मिळाला. रुपेश राजेंद्र मोहोळ (२२), करण राहुल साळवे (१९) आणि शिवम अरविंद कोहाड (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या