संजय राऊतांची इतकी चिडचिड कशासाठी?भाजपा आमदार नितेश राणे यांचा सवाल

कणकवली : उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली अशी माध्यमांपर्यंत पोहोचलेली बातमी काँग्रेस पक्षाच्या सोर्समधून गेलेली आहे.त्याच काँग्रेसवाल्यांसोबत संजय राजाराम राऊत मांडीला मांडी लावून बसतो आणि त्याच नेत्यांचे बाप काढतो. जर तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटला नसाल आणि तुमच्या मनात काहीच काळेबेरे नसेल तर एवढी तडफड कशाला? असा सवाल करत, चोर के दाढी मे टिनका नसेल तर तुम्हाला राग येण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तुमची चिडचिड होते आहे. तडफड होते आहे.याचा अर्थच दाल मे कुछ तो काला है..! या पुरी दाल ही काली है..! असा टोला भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी लगावला.


कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले,जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत ते काँग्रेसचे कधीच होऊ शकणार नाहीत.त्यामुळे काँग्रेसने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि संजय राजाराम राऊतसारख्या बिन भरोशाच्या माणसावर किती विश्वास ठेवावा हे ठरवावे.


आतापर्यंत राऊतांचे कुठले आरोप खरे ठरलेत. याबाबत माध्यमांनी त्याला विचारले पाहिजे.कोणाची रोकडं सापडली की, संजय राऊत ती रोकडं महायुतीची आहे असे ओरडतो.लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पण बॅग चेक केली होतीच ना काय मिळालं? त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपांना मनोरंजन म्हणून महाराष्ट्र पहात आहे. एकता कपूरने त्याला सीरिअलमध्ये घ्यावे.कारण त्याचे डायलॉग कोणीच गांभीर्याने घेत नाही,अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या