संजय राऊतांची इतकी चिडचिड कशासाठी?भाजपा आमदार नितेश राणे यांचा सवाल

  80

कणकवली : उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली अशी माध्यमांपर्यंत पोहोचलेली बातमी काँग्रेस पक्षाच्या सोर्समधून गेलेली आहे.त्याच काँग्रेसवाल्यांसोबत संजय राजाराम राऊत मांडीला मांडी लावून बसतो आणि त्याच नेत्यांचे बाप काढतो. जर तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटला नसाल आणि तुमच्या मनात काहीच काळेबेरे नसेल तर एवढी तडफड कशाला? असा सवाल करत, चोर के दाढी मे टिनका नसेल तर तुम्हाला राग येण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तुमची चिडचिड होते आहे. तडफड होते आहे.याचा अर्थच दाल मे कुछ तो काला है..! या पुरी दाल ही काली है..! असा टोला भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी लगावला.


कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले,जे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत ते काँग्रेसचे कधीच होऊ शकणार नाहीत.त्यामुळे काँग्रेसने सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि संजय राजाराम राऊतसारख्या बिन भरोशाच्या माणसावर किती विश्वास ठेवावा हे ठरवावे.


आतापर्यंत राऊतांचे कुठले आरोप खरे ठरलेत. याबाबत माध्यमांनी त्याला विचारले पाहिजे.कोणाची रोकडं सापडली की, संजय राऊत ती रोकडं महायुतीची आहे असे ओरडतो.लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची पण बॅग चेक केली होतीच ना काय मिळालं? त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपांना मनोरंजन म्हणून महाराष्ट्र पहात आहे. एकता कपूरने त्याला सीरिअलमध्ये घ्यावे.कारण त्याचे डायलॉग कोणीच गांभीर्याने घेत नाही,अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी