ठाण्यात हिट अँड रन, वेगवान मर्सिडिजने २१ वर्षीय तरूणाला चिरडले

मुंबई: ठाण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनची(hit and run) घटना घडली आहे. २१ ऑक्टोबरच्या रात्री एका वेगाने जाणाऱ्या मर्सिडिज कारने २१ वर्षीय तरूणाला चिरडले. यात या तरूणाचा मृत्यू झाला. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचे नाव दर्शन हेगडे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय दर्शन हेगडे २१ ऑक्टोबरच्या रात्री काही खाण्याचे सामान घेऊन आपल्या घराच्या दिशेने परतत होता. त्याचवेळेस नाशिक हायवेच्या दिशेने जाणाऱ्या मर्सिडिज कारने तरूणाला चिरडले


या घटनेनंतर कार चालक फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे आणि कार ताब्यात घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. ही दुर्घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे स्थित निवासस्थानापासून काही अंतरावर घडली आहे.



एक महिन्यांपूर्वी घडली होती हिट अँड रनची घटना


साधारण एक महिन्यांपूर्वी मुंबईत हिट अँड रनची घटना समोर आली होती. येथील दहिसर परिसरात एका वेगवान कारने बाईकवर स्वार असलेल्या दोन तरूणांना चिरडले होते. यात एका तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्य जखमी झाला. तक्रारकर्ता करण राजपूत आपला मित्र आदित्यसोबत दहिसर येथून कांदिवलीच्या दिशेने बाईकवरून जात होता. त्याचा तिसरा मित्र पियुष शुक्लाही त्याच्यासोबत बाईक चालवत होता. जसे तिघेही शैलेंद्र हायस्कूल पूलच्या खाली पोहोचले, वेगाने येणाऱ्या कारने करण राजपूतच्या बाईकला टक्कर दिली. यात करण आणि आदित्य दोघेही गंभीर जखमी झाले.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये