जम्मू - काश्मीरला लवकरच मिळणार पूर्ण राज्याचा दर्जा!

नायब राज्यपालांची मंजुरी, केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा


नवी दिल्ली : जम्मू - काश्मीर राज्यातून लडाख वेगळा करत हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित करण्यात आले होते. यानंतर आता जम्मू - काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला नायब राज्यपालांची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या कॅबिनेटने दोन दिवसांपूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्याने केंद्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.


जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्वात गुरुवारीच मंजूर झाला होता. पण शनिवारी अधिकृतरीत्या हा निर्णय घेण्यात आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी जम्मू - काश्मीर विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू होणार आहे. तत्पूर्वीच कॅबिनेटने जम्मू - काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावात म्हटले आहे की, पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे ही राज्याच्या विकास प्रक्रियेची सुरुवात असेल. यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना आपले संविधानिक अधिकार पुन्हा प्राप्त होतील.


उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी म्हणाले की, केंद्राने आपले वचन पूर्ण करावे आणि राज्याचा दर्जा बहाल करावा, तो आमचा हक्क आहे. त्यांनी आधीच जे वचन दिले आहे तेच आम्ही मागत आहोत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला दोन दिवसांत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला