Nitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची 'डी' गँग झाली आहे!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात


मुंबई : केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दररोज कोणतेही विधान मांडतो. आज संजय राऊतने 'भाजपा पक्ष हा बिश्नोई गँग आहे', या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला चांगलेच फटकारले आहे. हिंदूचा द्वेश करणं, त्यांना टार्गेट करणं, पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणं या सर्व दाऊद गँगचे गुण उबाठाने घेतलेले आहेत. म्हणून शिवसेना उबाठा ही 'डी' कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही गँगची उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झालेली आहे त्यावर लक्ष द्यावे. नंतर भाजपाला नावं ठेवत बसावे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतचा मालक म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.


काल पुन्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच्या ईश्वरपूरमध्ये राहून कानाखाली मारली. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यासाठी कपडे देखील शिवत आहे. तर दुसऱ्याबाजूने शरद पवार, नाना पटोले हे यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणून उद्धव ठाकरेची लायकी काय आहे, हे आम्ही सांगण्यापेक्षा मविआचे मित्रमंडळ पक्ष दाखवत आहे, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी