Nitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची 'डी' गँग झाली आहे!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात


मुंबई : केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दररोज कोणतेही विधान मांडतो. आज संजय राऊतने 'भाजपा पक्ष हा बिश्नोई गँग आहे', या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला चांगलेच फटकारले आहे. हिंदूचा द्वेश करणं, त्यांना टार्गेट करणं, पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणं या सर्व दाऊद गँगचे गुण उबाठाने घेतलेले आहेत. म्हणून शिवसेना उबाठा ही 'डी' कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही गँगची उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झालेली आहे त्यावर लक्ष द्यावे. नंतर भाजपाला नावं ठेवत बसावे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतचा मालक म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.


काल पुन्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच्या ईश्वरपूरमध्ये राहून कानाखाली मारली. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यासाठी कपडे देखील शिवत आहे. तर दुसऱ्याबाजूने शरद पवार, नाना पटोले हे यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणून उद्धव ठाकरेची लायकी काय आहे, हे आम्ही सांगण्यापेक्षा मविआचे मित्रमंडळ पक्ष दाखवत आहे, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी