Nitesh Rane : काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये!

आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना फटकारले


मुंबई : संजय राजाराम राऊतसारख्या (Sanjay Raut) बिकाऊ माणसाने भाजपा पक्ष मदारी आणि इतर सर्व माकडं आहेत, असं वक्तव्य करण्याआधी स्वत:च्या बुडाखाली काय आग लागली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उबाठाला (UBT) एका-एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठीवर मुजरे करावे लागतात, नाक रगडायला लागतं तरीही काँग्रेस यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतवर केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली.



त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नाही


दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं, स्वत:ची घरे मोठी करणं या पलीकडे जाऊन संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरेने काहीच केलं नाही. त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नसल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांसाठी केलेला त्याग संजय राऊतसारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला