Nitesh Rane : काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये!

आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना फटकारले


मुंबई : संजय राजाराम राऊतसारख्या (Sanjay Raut) बिकाऊ माणसाने भाजपा पक्ष मदारी आणि इतर सर्व माकडं आहेत, असं वक्तव्य करण्याआधी स्वत:च्या बुडाखाली काय आग लागली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उबाठाला (UBT) एका-एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठीवर मुजरे करावे लागतात, नाक रगडायला लागतं तरीही काँग्रेस यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतवर केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली.



त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नाही


दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं, स्वत:ची घरे मोठी करणं या पलीकडे जाऊन संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरेने काहीच केलं नाही. त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नसल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांसाठी केलेला त्याग संजय राऊतसारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी