Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकीच्या तारखा होणार जाहीर

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांसह सर्वांना उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोग (Election Commission) दुपारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.


राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यासोबत आचारसंहितेची सुद्धा या पत्रकार परिषदेद्वारे घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता होणा-या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे.



उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे घेणार सदस्यत्वाची शपथ


महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्य आज दुपारी १२ वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडून सदस्यत्वाची शपथ घेतील. विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृह येथे हा शपथविधीचा कार्यक्रम होईल.


त्याचबरोबर श्रीमती चित्रा किशोर वाघ, श्री विक्रांत पाटील, श्री धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्री पंकज छगन भुजबळ, श्री इद्रिस इलियास नाईकवाडी, श्री हेमंत श्रीराम पाटील, डॉ श्रीमती मनीषा कायंदे हे नामनियुक्त सन्माननीय सदस्य देखील शपथ घेणार आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी