Ajit Pawar : अजित दादांना सोलापुरातील अकरा पैकी केवळ तीनच मतदारसंघ मिळणार!

सोलापूर : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) बिगुल थोड्याच दिवसांत वाजणार आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) जागा वाटपाची आकडेवारी अजूनही गुलदस्त्यात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी (Assembly Constituency) अजित दादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला फक्त तीन जागा महायुतीतून सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.


माढा विधानसभा, करमाळा विधानसभा आणि मोहोळ विधानसभा या तीन जागांवर अजित दादांच्या शिलेदारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात शरद पवारांची तुतारी लढणार आहे. पवार कुटुंबातील काका पुतण्याची लढाई सोलापूरच्या तीन विधानसभा मतदारसंघात होणार आहे.


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजन पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार यशवंत माने असतील अशी घोषणा यापूर्वीच केली आहे. माढ्यातून बबनदादा शिंदें तीस वर्षांपासून आमदार आहेत,यंदा त्यांचे चिरंजीव रणजित शिंदें यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, तुतारी हातात घेतील आणि निवडणूकीच्या रिंगणात उतरतील, असे चित्र निर्माण झाले आहे. अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयांचा विरोध पाहून माढ्याच्या बबनदादांना तुतारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे रणजित शिंदे ऐवजी बबन दादा शिंदेंच माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ पक्षातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.


तर करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे अजित दादांच्या राष्ट्रवादी हे उमेदवार राहणार आहे, अशी माहिती देखील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार