प्रहार    

Ratnagiri News : स्वप्नाच्या पुढे नियतीचा खेळ! वैष्णवी मानेची ह्दयद्रावक घटना

  147

Ratnagiri News : स्वप्नाच्या पुढे नियतीचा खेळ! वैष्णवी मानेची ह्दयद्रावक घटना

नवरात्रोत्सवात गरबा खेळताना चक्कर आली, अन्...


रत्नागिरी : प्रत्येकाचे काहीना काही मोठं करायचे स्वप्न असते. मात्र स्वप्नाच्या पुढे नियती तिचा कोणता खेळ मांडेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशीच एक घटना कोकनातील रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील सर्वात हुशार आणि प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थानी असणाऱ्या वैष्णवी प्रकाश माने (१६) या विद्यार्थिनीला गरबा खेळताना चक्कर आली आणि यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वैष्णवीच्या कुटुंबावरही दु:खाचे डोंगर पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसारा, वैष्णवी माने हिचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमात ही दुर्दैवी घटना घडली.



निष्ठूर नियतीच्या खेळामुळे स्वप्न अधुरं


रत्नागिरीमधील आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून तिने पहिला क्रमांक पटकवला होता. इंजिनिअरिंग करण्याचे वैष्णवीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. दहावीमध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशनही मिळाले होते. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने अॅडमिशन मिळालेलं हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवीने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. मात्र वैष्णवी हिला गरबा खेळताना चक्कर आली आणि ती तिचा यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे वैष्णवीचे लहानपणीचे स्वप्न भंग झाले, अशी माहिती वैष्णवीच्या शिक्षकांनी दिली.



वैष्णवीचा शिक्षणासाठीचा प्रवास


राजापूर पाचल येथील महाविद्यालयात शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉपपर्यंत रोज येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने प्रवास करून पाचल येथे हायस्कूलमध्ये जात होती. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

इम्तियाज जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी, थेट मुख्यमंत्र्यांना पार्टीचं निमंत्रण

१५ ऑगस्ट रोजी, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय अनेक महापालिकांनी घेतला . या निर्णयावरून,

रायगड : आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, रायगडमध्ये पुन्हा पालकमंत्रीपदावरून वाद

महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरुन असलेला वाद राज्याला सर्वश्रुत आहे.रायगडच्या

रत्नागिरी : लव्ह जिहादला एकत्र येऊन उत्तर द्या, राज्यात हिंदूंचे भक्कम सरकार - नितेश राणे

रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकलनाच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव्ह

कोकणात राष्ट्रवादीला धक्का प्रशांत यादव भाजपमध्ये करणार प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंत्री नितेश राणे यांनी कोकणात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील

'ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५'च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल

कांदा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातील ९६७२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १८ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत

येवला: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला लासलगाव