Ratnagiri News : स्वप्नाच्या पुढे नियतीचा खेळ! वैष्णवी मानेची ह्दयद्रावक घटना

नवरात्रोत्सवात गरबा खेळताना चक्कर आली, अन्...


रत्नागिरी : प्रत्येकाचे काहीना काही मोठं करायचे स्वप्न असते. मात्र स्वप्नाच्या पुढे नियती तिचा कोणता खेळ मांडेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशीच एक घटना कोकनातील रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील सर्वात हुशार आणि प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थानी असणाऱ्या वैष्णवी प्रकाश माने (१६) या विद्यार्थिनीला गरबा खेळताना चक्कर आली आणि यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वैष्णवीच्या कुटुंबावरही दु:खाचे डोंगर पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसारा, वैष्णवी माने हिचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमात ही दुर्दैवी घटना घडली.



निष्ठूर नियतीच्या खेळामुळे स्वप्न अधुरं


रत्नागिरीमधील आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून तिने पहिला क्रमांक पटकवला होता. इंजिनिअरिंग करण्याचे वैष्णवीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. दहावीमध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशनही मिळाले होते. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने अॅडमिशन मिळालेलं हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवीने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. मात्र वैष्णवी हिला गरबा खेळताना चक्कर आली आणि ती तिचा यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे वैष्णवीचे लहानपणीचे स्वप्न भंग झाले, अशी माहिती वैष्णवीच्या शिक्षकांनी दिली.



वैष्णवीचा शिक्षणासाठीचा प्रवास


राजापूर पाचल येथील महाविद्यालयात शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉपपर्यंत रोज येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने प्रवास करून पाचल येथे हायस्कूलमध्ये जात होती. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर