मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची शेवटची बैठक गुरुवारी पार पडली, यावेळी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. पण या बैठकीतून अजित पवार अर्ध्यातूनच निघून गेले होते. अजित पवार नाराज असल्याने या बैठकीतून अर्ध्यातूनच निघून गेले असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेवर आता खुद्द अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवार म्हणाले, काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात माझ्या नियोजित कार्यक्रम होता. तर कालच सकाळी १० वाजता कॅबिनेटची बैठक होती. पण काही कारणांमुळे ही बैठक उशीरा सुरु झाली. पण माझ्या हेलिकॉप्टरला दुपारी १ वाजता टेकऑफ करायचं होतं. त्यामुळं कॅबिनेट उशीरा सुरु झाल्यानं साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत मी तिथे थांबलो. १ वाजता मला जाणे गरजेचे होते. कारण २ वाजेपर्यंत मला नांदेडला पोहोचून तिथून पुन्हा हेलिकॉप्टरने अहमदपूरला जायचे होते. तिथे अत्यंत साधेपणाने एक शेतकरी मेळावा मी केला. यावेळी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर मी पुन्हा मुंबईत आलो, अशी खरी वस्तुस्थिती आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय मंत्रिमंडळ बैठकीत आला. माध्यमांच्या वृत्तानुसार अजित पवार यांनी नाराज होत मंत्रिमंडळाची बैठक १० मिनिटांतच सोडल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता अजित पवार यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…