Ladki Bahin Yojana : योजनेचा लाभ न मिळालेल्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

'या' तारखेआधीच करा अर्ज


मुंबई : महिलांना आर्थिक दृषट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेद्वारे पात्र अर्जदार महिलांना १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना तीन हप्ते दिले आहेत. तसेच काहींना चौथा आणि पाचव्या महिन्याचा हप्ता आधीच मिळाला आहे. परंतु आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज न भरलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. महिला आता १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करु शकणार आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ न घेतलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.


दरम्यान, मुदतवाढसह सरकारने योजनेत मोठा बदल केला आहे. त्यानुसार महिला आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने न भरता केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनच भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात