
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांच्या निधनाचे (Ratan Tata death) वृत्त प्रसिद्ध होताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रतन टाटांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेतृत्त्व, एक दयाळू व्यक्तीमत्त्व आणि एक विलक्षण माणूस होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना स्थिर नेतृत्व दिले. त्यांचे योगदान बोर्डरूमच्या पलीकडे गेले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले. रतन टाटा यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक कारणांमध्ये ते आघाडीवर होते. रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण #रतन_टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय… pic.twitter.com/8aXCcxxcuO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 10, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली
रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर त्यांनी देश आणि समाजासाठी ज्या पद्धतीने काम केले त्यामुळे ते एक मोठे व्यक्तिमत्व देखील होते. त्यांनी केवळ यशस्वी उद्योगच उभारले नाहीत तर एक ट्रस्ट स्थापन केला आहे, एक ब्रँड ज्याने आपल्या देशाला जागतिक प्रतिमा मिळवून दिली आहे. खूप मोठ्या मनाची व्यक्ती आज आपल्याला सोडून गेली, ही देशाची मोठी हानी आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व - शरद पवार
“जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणा-या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी श्रद्धांजली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाहिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी वाहिली रतन टाटा यांना श्रद्धांजली..
Maharashtra Governor CP Radhakrishnan expresses grief on the demise of the Chairman Emeritus of the Tata Group, Ratan Tata
In a condolence message, the Governor said: "Shri Ratan Tata was one of the the brightest jewels of the global Tata empire founded by the late Jamshedji…
— ANI (@ANI) October 10, 2024
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वाहिली रतन टाटा यांना आदरांजली..
Deeply saddened by the passing of Sh. Ratan Tata, a visionary business leader, an extraordinary nation-builder, and a remarkable human being.
His contributions to industry, society, and humanity have left an indelible legacy.
Heartfelt condolences to his family and loved ones… pic.twitter.com/upU2v8ivwP
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 10, 2024
रतन टाटांचे योगदान उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी असेल
श्री रतन टाटा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय उद्योगातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांचे योगदान स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी आणि त्यापुढील उद्योजकांसाठी सदैव प्रेरणादायी असेल. एक वचनबद्धता आणि करुणा असलेला माणूस, त्यांचे परोपकारी योगदान आणि विनम्रतेने त्यांनी स्वीकारलेल्या नीतिमत्तेचे प्रतिबिंब भारतीय उद्योगातील चिरस्थायी वारसा सोडत असल्याने या दुःखाच्यावेळी त्यांचे कुटुंब, मित्र, प्रशंसक आणि त्यांच्या संपूर्ण टाटा समूहाकडे मनापासून संवेदना व्यक्त करतो ओम शांती, या शब्दांत उपराष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली.
भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली : गौतम अदानी
"भारताने एक दिग्गज, दूरदर्शी व्यक्ती गमावली आहे, ज्यांनी आधुनिक भारताचा मार्ग नव्याने परिभाषित केला. रतन टाटा हे केवळ एक व्यावसायिक नेतृत्व नव्हतं - त्यांनी प्रामाणिकपणा, करुणा आणि व्यापक हितासाठी अढळ बांधिलकीसह भारताच्या भावनेला मूर्त रूप दिले. त्यांच्यासारखे दिग्गज कधीच कधीत जात नाहीत. ओम शांती", असं म्हणत उद्योजक गौतम अदानी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
India has lost a giant, a visionary who redefined modern India's path. Ratan Tata wasn’t just a business leader - he embodied the spirit of India with integrity, compassion and an unwavering commitment to the greater good. Legends like him never fade away. Om Shanti 🙏 pic.twitter.com/mANuvwX8wV
— Gautam Adani (@gautam_adani) October 9, 2024