Accident News : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक

  87

१६ प्रवासी गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसची समोर असणाऱ्या कंटेनरला जोददार धडक बसली. या धडकेत १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव खासगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.


दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. विकासाचा महामार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्ग पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई :  राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.  त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या