Accident News : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बसची कंटेनरला जोरदार धडक

१६ प्रवासी गंभीर जखमी


छत्रपती संभाजीनगर : राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसची समोर असणाऱ्या कंटेनरला जोददार धडक बसली. या धडकेत १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार,आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव खासगी बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत १६ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली.


दरम्यान, जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. विकासाचा महामार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या या महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्ग पोलिसांकडून अपघात रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

नवरात्रौत्सवात झेंडूचे दर वाढले, उत्पादन घटल्याने किंमतीवर परिणाम

रायगड : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असून, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात

महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला धनगर आरक्षणासाठी उपोषणस्थळी जात असताना घडली घटना जालना

मेट्रो मार्ग ४ व ४ए प्रकल्प हे ठाणेकरांसाठी नवे श्वासवायू - परिवहन मंत्री

मुंबई : मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या समस्येचे समाधान म्हणून महत्त्वाकांक्षी ठरणारा मेट्रो मार्ग ४ व ४ए