हरियाणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे (Haryana Elections Result) निकाल आज जाहीर झाले. त्यानुसार, भाजपा हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी (Naib Singh Saini) यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पाच मंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता (Gyan Chand Gupta) यांना पंचकुला मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसचे चंद्रमोहन येथून विजयी झाले आहेत. चंद्रमोहन माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे पुत्र आहेत.
दुसरीकडे मंत्री संजय सिंह नूह विधानसभा मतदारसंघातून हरले आहेत. नूह विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आफताब अहमद विजयी झाले आहेत.
तर जगाधरीमधून माजी मंत्री कंवरपाल गुर्जर यांचा देखील पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार चौधरी अक्रम खान विजयी झाले आहेत.
माजी आरोग्य मंत्री डॉ कमल गुप्ता हिसार मतदारसंघातून निवडणूक पराभूत झाले आहेत. येथे अपक्ष उमेदवार आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल विजयी झाल्या आहेत.
दुसरीकडे माजी मंत्री सुभाष सुधा यांचा ठाणेसर मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे अशोक अरोरा विजयी झाले आहेत.
तर रानिया मतदारसंघातून माजी मंत्री रणजीत चौटाला देखील पराभूत झाले आहेत. या मतदारसंघात INLD-BSP युतीचे उमेदवार अर्जुन चौटाला विजयी झाले आहेत.
दरम्यान, भाजपाने (BJP) ४९ जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) ३७ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा हरियाणामध्ये सरकार स्थापन करणार हे निश्चित झाले आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…