Mumbai Local : प्रवाशांची गैरसोय टळणार! आता मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर जलद लोकल थांबणार

  99

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) मोठी अपडेट समोर आली आहे. प्रवाशांचा रेल्वे प्रवास (Railway) सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रयत्न सुरु असतात. अनेकदा गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने रेल्वे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. प्रवाशांचा धाकधुकीचा प्रवास पाहता प्रशासनाकडून रेल्वे वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनाने कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर जलद लोकलला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजेच ‘ऑफिस अवर्स’मध्ये दोन-दोन रेल्वे गाड्यांना (Mumbai Local) या स्थानकांवे थांबा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.



कोणत्या फास्ट लोकल्सना थांबा?



  • कळवा रेल्वे स्थानकात सकाळी ८.५६ ला अंबरानाथहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात सकाळी ९.२३ ला आसनगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • कळवा स्थानकात संध्याकाळी ७.२९ ला मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात संध्याकाळी ७.४७ वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत