Mumbai Local : प्रवाशांची गैरसोय टळणार! आता मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर जलद लोकल थांबणार

  109

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) मोठी अपडेट समोर आली आहे. प्रवाशांचा रेल्वे प्रवास (Railway) सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रयत्न सुरु असतात. अनेकदा गर्दीच्या वेळी प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने रेल्वे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते. प्रवाशांचा धाकधुकीचा प्रवास पाहता प्रशासनाकडून रेल्वे वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनाने कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर जलद लोकलला थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजेच ‘ऑफिस अवर्स’मध्ये दोन-दोन रेल्वे गाड्यांना (Mumbai Local) या स्थानकांवे थांबा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.



कोणत्या फास्ट लोकल्सना थांबा?



  • कळवा रेल्वे स्थानकात सकाळी ८.५६ ला अंबरानाथहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात सकाळी ९.२३ ला आसनगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबेल.

  • कळवा स्थानकात संध्याकाळी ७.२९ ला मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

  • मुंब्रा स्थानकात संध्याकाळी ७.४७ वाजता मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल थांबेल.

Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी