पतीशी फोनवर भांडण झाल्याने पत्नीने पोटच्या मुलीला संपवले

लखनऊ: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे. पतीशी भांडण झाल्यानंतर एका महिलेने आपल्या ८ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.


न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी गुरूवारी सांगितले की एका महिलेने दावा केला होता की तिची आठ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाली आहे. मात्र पोलिसांना तपासादरम्यान आढळले की आपल्या पतीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या पत्नीनेच आपल्या मुलीची हत्या केली होती.


ही घटना २९ सप्टेंबरला परसपूर भागात घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार मुलगी अनेकदा या दाम्पत्याच्या भांडणाचे कारण होत असे. २९ सप्टेंबरच्या रात्री फोन कॉलवर पतीसोबत भांडण झाल्यानंतर रागात असलेल्या पत्नीने आपल्या मुलीला घराजवळच्या सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले होते.त्यानंतर सकाळी दावा केला की तिची मुलगी बेपत्ता झाली आहे.


आरोपी महिलेचा पती कामानिमित्त मुंबईत राहत असे. तर पत्नी जगमती आपल्या सासरच्यांसोबत गावात राहत होती. सोमवारी सकाळी जगमतीने कुटुंबियांना सांगितले की तिची मुलगी शगुन बेपत्ता झाली आहे. तिने असा दावाही केला की तिला कोणीतरी जंगली प्राणीघेऊन गेला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता जगमतीच्या घराच्या मागे सेप्टिक टँकमध्ये मुलीचा मृतदेह आढळला.


पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर कोणतेही निशाण नव्हते. तिचा मृत्यू बुडल्यामुळे झाला. यानंतर पोलिसांनी जेव्हा जगमतीकडे चौकशी सुरू केली तेव्हा तिच्या विधानांमध्ये अंतर होते. जेव्हा तिच्याकडे कडक चौकशी केली असता तिनेच आपल्या मुलीला मारल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा