PM Narendra Modi : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' उत्पादने खरेदी करा!

पंतप्रधान मोदींचे 'मन की बात'मधून जनतेला आवाहन


नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' (Made In India) उत्पादने खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) मधून जनतेला केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान 'मोदी मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज ११४ वा एपिसोड प्रसिद्ध करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी चौथ्यांदा या रेडिओ शोद्वारे (Radio Show) आपले मत व्यक्त केले. यावेळचा एपिसोडही खास आहे कारण तो प्रसारित होऊन दहा वर्षे पूर्ण करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी या ‘मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडीया’ यावर विशेष भर दिला.


“या महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मोहिमेच्या यशामध्ये देशातील मोठ्या उद्योगांचे लहान दुकानदारांचे योगदान समाविष्ट आहे. मी ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलत आहे. आज मला खूप आनंद होत आहे. गरीब,मध्यमवर्ग आणि एमएसएमईंना या मोहिमेचा भरपूर फायदा होत आहे.“या सणासुदीच्या काळात तुम्ही तुमचा जुना संकल्प पुन्हा पुन्हा करा. तुम्ही जे काही खरेदी कराल ते फक्त मेड इन इंडियाच असले पाहिजे. तुम्ही जे काही भेट म्हणून द्याल तेही मेड इन इंडियाच असावे, असे मोदी म्हणाले.


ते म्हणाले,“आमच्या ‘मन की बात’च्या प्रवासाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ सुरू करण्यात आली होती आणि हा असा पवित्र योगायोग आहे की, यंदा ३ ऑक्टोबरला ‘मन की बात’ला १०वर्षे पूर्ण होणार आहेत.


ते म्हणाले,२ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ला १० वर्षे पूर्ण होत आहेत.ज्यांनी भारतीय इतिहासातील एवढी मोठी जनआंदोलन घडवली त्यांचे अभिनंदन करण्याचा हा एक प्रसंग आहे. हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे. आयुष्यभर या कारणासाठी समर्पित राहिले.”

Comments
Add Comment

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून