PM Narendra Modi : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' उत्पादने खरेदी करा!

पंतप्रधान मोदींचे 'मन की बात'मधून जनतेला आवाहन


नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात फक्त 'मेड इन इंडिया' (Made In India) उत्पादने खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) मधून जनतेला केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान 'मोदी मन की बात'च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज ११४ वा एपिसोड प्रसिद्ध करण्यात आला. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी चौथ्यांदा या रेडिओ शोद्वारे (Radio Show) आपले मत व्यक्त केले. यावेळचा एपिसोडही खास आहे कारण तो प्रसारित होऊन दहा वर्षे पूर्ण करत आहे.पंतप्रधान मोदी यांनी या ‘मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडीया’ यावर विशेष भर दिला.


“या महिन्यात आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मोहिमेच्या यशामध्ये देशातील मोठ्या उद्योगांचे लहान दुकानदारांचे योगदान समाविष्ट आहे. मी ‘मेक इन इंडिया’बद्दल बोलत आहे. आज मला खूप आनंद होत आहे. गरीब,मध्यमवर्ग आणि एमएसएमईंना या मोहिमेचा भरपूर फायदा होत आहे.“या सणासुदीच्या काळात तुम्ही तुमचा जुना संकल्प पुन्हा पुन्हा करा. तुम्ही जे काही खरेदी कराल ते फक्त मेड इन इंडियाच असले पाहिजे. तुम्ही जे काही भेट म्हणून द्याल तेही मेड इन इंडियाच असावे, असे मोदी म्हणाले.


ते म्हणाले,“आमच्या ‘मन की बात’च्या प्रवासाला १० वर्षे पूर्ण होत आहेत. १० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ सुरू करण्यात आली होती आणि हा असा पवित्र योगायोग आहे की, यंदा ३ ऑक्टोबरला ‘मन की बात’ला १०वर्षे पूर्ण होणार आहेत.


ते म्हणाले,२ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ला १० वर्षे पूर्ण होत आहेत.ज्यांनी भारतीय इतिहासातील एवढी मोठी जनआंदोलन घडवली त्यांचे अभिनंदन करण्याचा हा एक प्रसंग आहे. हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे. आयुष्यभर या कारणासाठी समर्पित राहिले.”

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी