दुर्गापूजा, दिवाळी, छठ सणांसाठी ६००० पेक्षा अधिक विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रेल्वे या वर्षी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी ६००० पेक्षा अधिक विशेष सेवा चालवणार आहे. रेल्वेद्वारे दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवल्या जातात आणि या वर्षी प्रवाशांची वर्दळ सामावून घेण्यासाठी गाड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.


पुढील दोन महिन्यांत, या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी अखंडपणे पोहोचवतील. गेल्या वर्षी २०२३ मध्ये, भारतीय रेल्वेने लक्षावधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या एकूण ४४२९ फेस्टिवल स्पेशल ट्रेन्स चालवल्या. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने लोक दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी हे सण केवळ धार्मिक महत्त्वाचे नसून त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र येण्याची एक महत्त्वाची संधीही देतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे बहुतांश गाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने अगोदरच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वे या वर्षी सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवत आहे.


प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी ५८ गाड्यांच्या ३४६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. मागील वर्षीच्या जवळपास ४५०० सेवा चालवण्याच्या उत्तम कामगिरीपेक्षाही ही लक्षणीय वाढ आहे.

Comments
Add Comment

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण