दुर्गापूजा, दिवाळी, छठ सणांसाठी ६००० पेक्षा अधिक विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रेल्वे या वर्षी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी ६००० पेक्षा अधिक विशेष सेवा चालवणार आहे. रेल्वेद्वारे दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवल्या जातात आणि या वर्षी प्रवाशांची वर्दळ सामावून घेण्यासाठी गाड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.


पुढील दोन महिन्यांत, या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी अखंडपणे पोहोचवतील. गेल्या वर्षी २०२३ मध्ये, भारतीय रेल्वेने लक्षावधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या एकूण ४४२९ फेस्टिवल स्पेशल ट्रेन्स चालवल्या. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने लोक दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी हे सण केवळ धार्मिक महत्त्वाचे नसून त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र येण्याची एक महत्त्वाची संधीही देतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे बहुतांश गाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने अगोदरच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वे या वर्षी सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवत आहे.


प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी ५८ गाड्यांच्या ३४६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. मागील वर्षीच्या जवळपास ४५०० सेवा चालवण्याच्या उत्तम कामगिरीपेक्षाही ही लक्षणीय वाढ आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

चिराग पासवानांनी घेतली नितीश कुमारांची भेट! एनडीएमध्ये विकासाची नवी समीकरणे?

Bihar election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या दमदार विजयामुळे राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर