दुर्गापूजा, दिवाळी, छठ सणांसाठी ६००० पेक्षा अधिक विशेष गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रेल्वे या वर्षी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी ६००० पेक्षा अधिक विशेष सेवा चालवणार आहे. रेल्वेद्वारे दरवर्षी सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालवल्या जातात आणि या वर्षी प्रवाशांची वर्दळ सामावून घेण्यासाठी गाड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.


पुढील दोन महिन्यांत, या विशेष गाड्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी अखंडपणे पोहोचवतील. गेल्या वर्षी २०२३ मध्ये, भारतीय रेल्वेने लक्षावधी प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या एकूण ४४२९ फेस्टिवल स्पेशल ट्रेन्स चालवल्या. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने लोक दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी हे सण केवळ धार्मिक महत्त्वाचे नसून त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र येण्याची एक महत्त्वाची संधीही देतात. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे बहुतांश गाड्यांची तिकिटे दोन ते तीन महिने अगोदरच प्रतीक्षा यादीत जातात. यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वे या वर्षी सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा विशेष गाड्या चालवत आहे.


प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी ५८ गाड्यांच्या ३४६ सेवा अधिसूचित केल्या आहेत. मागील वर्षीच्या जवळपास ४५०० सेवा चालवण्याच्या उत्तम कामगिरीपेक्षाही ही लक्षणीय वाढ आहे.

Comments
Add Comment

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,