गुजरात: द्वारकामध्ये भीषण अपघात, डिव्हाईडर तोडून आलेल्या बसने तीन गाड्यांना चिरडले, ७ जणांचा मृत्यू

द्वारका: गुजरातच्या द्वारकामध्ये शनिवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. यात चार मुलांसह सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर १४ जणांना गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातात बसने आपले नियंत्रण गमावल्याने ती डिव्हाईडर पार करून तीन गाड्यांना टक्कर दिली.


पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ५१वर शनिवारी रात्री साधारण पावणेआठच्या सुमारास घडला. ही बस द्वारका येथून अहमदाबाद येथे जात होती. रस्त्यामध्ये प्राणी आल्याने बसच्या ड्रायव्हरने नियंत्रण गमावले. प्राण्यांना वाचवण्यासाठी बस



४ मुलांसह सात जणांचा मृत्यू


 डिव्हाईडरला आपटली आणि स्पीड अधिक असल्याने बसने डिव्हाईडर पार करून समोरून येणाऱ्या तीन भरधाव गाड्यांना टक्कर दिली.


बसची धडक एक मिनी व्हॅन, एक कार आणि एका मोटारसायकलला बसली. यात अपघातात चार चिमुकल्यांसह सात जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर १४ जण जखमी झाले. यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



मिनी व्हॅनमधून प्रवास करत असणाऱ्या ६ जणांचा मृत्यू


या अपघातात प्राण गमावणारे ६ जण मिनी व्हॅनमध्ये होते. तसेच बसमधील एकाचा मृत्यू झाला. यात चार मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.



गांधीनगरला जात होती मिनी व्हॅन


घटनास्थळावरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी व्हॅन द्वारका येथून गांधीनगरच्या दिशेने जात होती. आपल्या गंतव्य स्थानापासून ते काही किलोमीटर दूर होते. मृतांमध्ये ६ जण गांधीनगरच्या कलोल येथे राहत होते.

Comments
Add Comment

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी