Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो", मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जम्मू : आज जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीरमधील ही शेवटची सभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, "जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांना भेट देण्याची संधी गेल्या आठवड्यात त्यांना मिळाली आणि ते जिथे गेले तिथे त्यांना भाजपाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला."


पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर चांगलाच निशाणा साधला आहे. "जम्मू-काश्मीरमधील लोक या तीन घराण्यांच्या राजकारणाला खूप कंटाळले आहेत. आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात इथल्या लोकांना नको आहे. लोकांना त्यांच्या मुलांचं चांगले भविष्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच भाजपा सरकारला लोक पाठिंबा देत आहेत. लोकांचा उत्साह जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे" असं म्हटलं आहे.



"हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो"


आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. "आजचीच रात्र होती जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला. आणि त्यावेळी भारताने जगाला दाखवून दिलं होतं की, "हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो" असं मोदींनी सांगितलं. तसंच काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याचा आरोप करत या मुद्द्यावर आजही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचं म्हटलं आहे.


जम्मूच्या जनतेला विशेष आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, "यापूर्वी इतिहासात कधीही अशी संधी मिळाली नाही, जी या निवडणुकीत आली आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार सरकार पहिल्यांदाच स्थापन होणार आहे. ही महत्त्वाची संधी असून ती गमावू नये. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मूतील जनतेचं सर्व दुःख दूर करू." नवरात्री आणि विजयादशमीचा संदर्भ "निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी, नवरात्रीच्या दिवशी येतील आणि यावेळी विजयादशमी ही एक शुभ सुरुवात असेल" असंही मोदींनी म्हटलं.


Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे