पोलिसांविरोधात याचिका करणारे असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय

विशिष्ट राजकीय पक्षांसाठी सरोदे यांचे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हीझम

शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची घणाघाती टीका


मुंबई : बदलापूरसारख्या संवेदनशील प्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून ते सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हीझम करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी आज केली. चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचा वकील सरोदे यांना एवढा पुळका का आला, असा सवाल डॉ. कायंदे यांनी यावेळी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


त्या पुढे म्हणाल्या की, सरोदे पेशाने वकील आहेत. त्यांना याचिका दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आमचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे वकील असीम सरोदे एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहेत का, अशी शंका डॉ. कायंदे यांनी व्यक्त केली.


सरोदे उबाठाच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात

मागील काही महिन्यांचा घटनाक्रम बघितला तर असीम सरोदे ठराविक राजकीय पक्षांना फायदा होईल, अशीच भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरेंशी सरोदे यांची भेट, ठाकरे कुटुंब आणि असीम सरोदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर आहेत. हेच वकील असीम सरोदे हे काही महिन्यांपूर्वी उबाठाच्या मंचावर बोलताना दिसले होते. सरोदे आणि ठाकरे यांच्या भेटीगाठींवरुन सरोदे उबाठाच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात का असा खरमरीत सवाल डॉ. कायंदे यांनी विचारला.



पोलिसांबाबत घेतलेल्या भूमिकेवर संशय


बदलापूर प्रकरण घडलं तेव्हा उत्स्फूर्तपणे जनआंदोलन झाले होते. तेव्हा विरोधकांनी आरोपीला ताबडतोब फाशी द्या, अशी मागणी केली होती. याबाबत खटला सुरु होता. मात्र रिमांडमध्ये असताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत वकील असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र वकील सरोदे यांचा पोलिसांबाबत घेतलेल्या भूमिकेवर संशय निर्माण होतो, असे डॉ. कायंदे म्हणाल्या.


कोविड काळात मुंबईत कोविड सेंटर घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा, खिचडी घोटाळा असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले त्याबाबत सरोदे न्यायालयात का गेले नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती, त्याविषयी सरोदेंनी न्यायालयात धाव का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात निर्भय बनो आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सरोदे यांनी आरोपांची राळ उठवली होती. माननीय राज्यपाल यांच्या विरोधातही सरोदे यांनी जाहीर अपशब्द काढले होते. संसदेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र सरोदे यांनी घेतले, असेही डॉ. कायंदे म्हणाल्या.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :