चेन्नईमध्ये ६ ऑक्टोबरला भारतीय वायूसेनेचा चित्तथरारक एयर शो!

नवी दिल्‍ली : भारतीय वायूसेना (Indian Air Force) आपला ९२वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाली असून या निमित्ताने ६ ऑक्टोबर २०२४ रोजी चेन्नईच्या (Chennai) आकाशात चित्तथरारक हवाई कसरतींचा समावेश असलेला एयर शो (Air Show) केला जाणार आहे. “भारतीय वायूसेना- सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर” ही या वर्षाच्या कार्यक्रमाची संकल्पना असून देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यामधील अविचल बांधिलकी अधोरेखित करणारी आहे.


या दिवशी चेन्नईच्या जनतेला मंत्रमुग्ध करण्यासाठी वायूसेनेची ७२ विमाने हवाई कसरतींमध्ये सहभागी होऊन आपल्या हवाई कौशल्याचे आणि समन्वयित उड्डाणाचे दर्शन घडवतील. सकाळी ११ वाजता चेन्नईच्या मरिना बीचवर हा कार्यक्रम होणार आहे.


भारतीय वायूसेनेच्या या अतिशय प्रसिद्ध पथकांव्यतिरिक्त वायूसेनेच्या ताफ्यात असलेल्या इतर विमानांच्या हवाई संचलनाचा आणि कसरतींचा देखील हवाई शो मध्ये समावेश आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक आणि वजनाने हलक्या तेजस या लढाऊ विमानाचा, तसेच वजनाने हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड आणि पूर्वीच्या काळी वापरली जाणारी हवाईदलाच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारी डाकोटा आणि हार्वर्ड ही विमाने यांचा देखील यात समावेश असू असेल.


६ ऑक्टोबर २०२४ रोजी मरिना बीचवर होणाऱा हा भव्य शो सर्वांसाठी खुला आहे. हा कार्यक्रम उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव देणारा असेल. यामध्ये भारताच्या हवाई गुणवत्तेचेच नव्हे तर भारतीय वायूसेनेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे, आणि देशाच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यामधील त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचे देखील दर्शन घडेल.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा