ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का?

  84

बच्चू कडू यांनी संजय राऊतांना फटकारले


अमरावती : संजय राऊतांना (Sanjay Raut) अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा देशात भाजपा आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना (Shivsena) तिसरीच होती ना? मग ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का? असा थेट सवाल करत प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांना फटकारले.


तसेच महाराष्ट्राच्या सातबारावर काय तुमचाच हक्क आहे का? लढण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आमच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपाला होईल की काँग्रेसला होईल ते तुम्ही कसं ठरवता? त्यामुळे अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही. त्यांनी जीभ सांभाळून बोलत राहावं असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसेच आगामी निवडणुकीत शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात तगडे उमेदवार देणार, अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.


विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीचे आव्हान उभे केले आहे.


या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी ही नेहमी भाजपाला मदत करते अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरुनच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे, त्यांची जहागीरदार नाही, असा घणाघात करत महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. तसेच या महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला.


आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, देशभरात आदर्श वाटेल असे राज्य उभे करु असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊ व २८८ जागा पूर्ण लढवू," अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या