ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का?

बच्चू कडू यांनी संजय राऊतांना फटकारले


अमरावती : संजय राऊतांना (Sanjay Raut) अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. जेव्हा देशात भाजपा आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना (Shivsena) तिसरीच होती ना? मग ये बावळटा, तेव्हा शिवसेना पैशासाठी लढत होती का? असा थेट सवाल करत प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांना फटकारले.


तसेच महाराष्ट्राच्या सातबारावर काय तुमचाच हक्क आहे का? लढण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. आमच्या तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपाला होईल की काँग्रेसला होईल ते तुम्ही कसं ठरवता? त्यामुळे अभ्यास न करता एखाद्या बावळट पोरासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही. त्यांनी जीभ सांभाळून बोलत राहावं असं म्हणत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. तसेच आगामी निवडणुकीत शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात तगडे उमेदवार देणार, अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.


विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू, ‘स्वाभिमानी शेतकरी’ संघटनेचे राजू शेट्टी तसेच ‘स्वराज्य’ संघटनेचे संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीचे आव्हान उभे केले आहे.


या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी ही नेहमी भाजपाला मदत करते अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरुनच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे, त्यांची जहागीरदार नाही, असा घणाघात करत महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. तसेच या महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला.


आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, देशभरात आदर्श वाटेल असे राज्य उभे करु असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देऊ व २८८ जागा पूर्ण लढवू," अशीही घोषणा बच्चू कडू यांनी केली.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे