CIDCO Lottery : सिडकोकडून आनंदवार्ता! नवी मुंबईत काढणार तब्बल ४०हजार घरांची लॉटरी

नवी मुंबई : नुकतेच म्हाडातर्फे मुंबईत जारी करण्यात आलेल्या घरांच्या सोडतसाठी अर्ज प्रक्रिया आज समाप्त करण्यात आली. म्हाडाच्या या लॉटरीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असताना आता सिडकोनेही सोडत (CIDCO Lottery) जारी केली आहे. या सोडतद्वारे सिडको नवी मुंबईत तब्बल ४० हजार घरांची सोडत काढणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोने नवी मुंबईत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. यामध्ये ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ ही घरे असणार आहेत. त्यामुळे या लॉटरीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



विमानतळाचे कामही प्रगतीपथावर


सिडकोचे घरांसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. विमानतळाचे एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.