Flowers Price Hike : पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार; मात्र दसऱ्याला पुन्हा कडाडण्याची शक्यता!

अमरावती : स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती. अशातच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला फुलांच्या भावात घसरण झाली. त्यामुळे आता पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असला तरीही दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडणार (Flowers Price Hike) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मागील दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फूलशेतीला बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी फूलशेती कोलमडली आहे. यामुळे फुलांची आवक कमी झाली असून सणासुदीचा काळ असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यामुळे सध्या फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे.


दरम्यान अमरावती तालुक्यांत अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झेंडू, अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती आदी फुलांचे भरघोस उत्पादन घेतात. मात्र, यावर्षी अनेक गावांत सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली.परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही, असे अकोळनेर (ता. नगर) येथील फूल उत्पादक शेतकरी तुषार मेहेत्रे यांनी सांगितले. पितृ पंधरवाड्यात झेंडूचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये राहतील. मात्र, नवरात्रीत व दसरा, दिवाळीत फुलांच्या भावात पुन्हा वाढ होईल, असे व्यापाऱ्यांनी म्हटले.



फुलांचे दर असे (रुपये/किलो)


झेंडू - ३०
शेवंती - ८०
गुलाब - २००
गुलछडी - १६०

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा