Accident News : मुळशीतील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू!

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर


पुणे : मुळशी तालुक्यातील हिट अँड रन प्रकरणातील गंभीर जखमी झालेल्या प्रेम चव्हाण (वय १४) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान नऊ दिवसांनंतर मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या प्रेम चव्हाण या विद्यार्थ्याच्या निधनानंतर मात्र मुळशी तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.


शुक्रवारी (दि. ६) शेरे (ता. मुळशी) येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयामध्ये शिकत असलेले प्रेम साहेबराव चव्हाण (इयत्ता ७वी), कार्तिक रामेश्वर मावकर (१४, इयत्ता ८वी) आणि सम्यक प्रमोद चव्हाण (१४, इयत्ता ८वी, सर्व रा. अकोले, ता. मुळशी) हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना भरधाव कारने त्यांना उडवले आणि कारचालक तसाच सुसाट निघून गेला.


दरम्यान, या अपघातात प्रेम हा गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारचालक रूपेश पांडे याला या प्रकरणी पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.



‘प्रेम’च्या उपचारासाठी नागरिकांनी दिली होती लाखोंची मदत


प्रेम चव्हाण हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला अजून एक लहान बहीण आहे तसेच त्याचे वडील हे गाडीचालक असल्याने त्याच्या घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. त्यामुळे प्रेम चव्हाण या लहानग्याचे प्राण वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या खर्चासाठी गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन पुढाकार घेत लाखो रुपयांची देणगीदेखील गोळा केली होती. मात्र, त्याचे प्राण न वाचल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध