Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी!

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर गणपती उत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश विसर्जनानंतर हजारो प्रवासी परतत असताना रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, मुसळधार पाऊस, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.


इंदापूर ते कोलाडदरम्यान २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे. कोकणातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने मुंगीच्या गतीने सरकत आहेत. याशिवाय, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणखीनच तीव्र झाली आहे.


एसटी महामंडळाने २,५५३ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे, मात्र ती देखील अपुरी ठरत आहे. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्या प्रवाशांची गरज भागवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्टेशनांवरही प्रचंड गर्दी झाली आहे.


या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, आणि लहान मुलांना होत आहे. चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत.


परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना