50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला samsungचा स्वस्त फोन लाँच

मुंबई: Samsungने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे जो सर्वसामान्यांच्या अतिशय बजेटमध्ये आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy M05. कंपनीच्या M सीरिजमधील हा नवा डिव्हाईस आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी Samsung Galaxy A05ला या स्पेसिफिकेशनसह लाँच केला होता.


यात मोठी स्क्रीन, ड्युअल रेयर कॅमेरा आणि ५०००एमएएची बॅटरी मिळते. यात सिक्युरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर देण्यात आला आहे. स्मार्टफोनला कंपनी चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स ऑफर करेल.



काय आहेत स्पेसिफिकेशन?


Samsung Galaxy M05मध्ये ६.७ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो. हा 60HZ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यत वाढवू शकता.


फोनमध्ये 50MPचा प्रायमरी रेयर कॅमेरा आणि 2MPचा डेप्थ सेन्सॉर मिळतो. म्हणजेच ड्युअल रेयर कॅमेरा सेटअप मिळेल. सिक्युरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर मिळतो. डिव्हाईसला पावर देण्यासाठी 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.


डिव्हाईस Android 14वर oneUI6 वर काम कतो. कंपनीचे हे म्हणणे आहे की या फोनला दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट मिळत राहील. या फोनसोबत तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.



किती आहे किंमत?


या फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेच व्हेरिएंटची किंमत ७९९९ रूपये आहे. तर हा फोन मिंट ग्रीन कलरमध्येही खरेदी करू शकता.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,