50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला samsungचा स्वस्त फोन लाँच

मुंबई: Samsungने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे जो सर्वसामान्यांच्या अतिशय बजेटमध्ये आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy M05. कंपनीच्या M सीरिजमधील हा नवा डिव्हाईस आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी Samsung Galaxy A05ला या स्पेसिफिकेशनसह लाँच केला होता.


यात मोठी स्क्रीन, ड्युअल रेयर कॅमेरा आणि ५०००एमएएची बॅटरी मिळते. यात सिक्युरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर देण्यात आला आहे. स्मार्टफोनला कंपनी चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स ऑफर करेल.



काय आहेत स्पेसिफिकेशन?


Samsung Galaxy M05मध्ये ६.७ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो. हा 60HZ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यत वाढवू शकता.


फोनमध्ये 50MPचा प्रायमरी रेयर कॅमेरा आणि 2MPचा डेप्थ सेन्सॉर मिळतो. म्हणजेच ड्युअल रेयर कॅमेरा सेटअप मिळेल. सिक्युरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सॉर मिळतो. डिव्हाईसला पावर देण्यासाठी 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.


डिव्हाईस Android 14वर oneUI6 वर काम कतो. कंपनीचे हे म्हणणे आहे की या फोनला दोन वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट आणि चार वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट मिळत राहील. या फोनसोबत तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही.



किती आहे किंमत?


या फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेच व्हेरिएंटची किंमत ७९९९ रूपये आहे. तर हा फोन मिंट ग्रीन कलरमध्येही खरेदी करू शकता.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत