जम्मू-काश्मीरच्या बारामुला येथे ३ दहशतवादी ठार!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी काल अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने अवघ्या २४ तासांच्या आत बारामुल्ला येथे शोधमोहिम राबवून ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अजूनही काही दहशतवादी लपून बसले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.


या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. मारले गेलेले दहशतवादी आणि त्यांच्या गटाची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यातील चत्रू गावात अजूनही दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे, जिथे शुक्रवारी दहशतवाद्यांच्या एका गटाशी झालेल्या चकमकीत लष्कराचे २ जवान हुतात्मा झाले आणि २ जण जखमी झाले आहे.


जम्मू विभागातील पुंछ, राजौरी, डोडा, कठुआ, रियासी आणि उधमपूर या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये २ महिन्यांहून अधिक काळ लष्कर, सुरक्षा दल आणि नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी अचानक हल्ला करतात आणि नंतर डोंगराळ भागातील जंगलात गायब होतात या हल्ल्यांना परदेशी दहशतवाद्यांचा एक गट जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या दहशतवाद्यांची संख्या ४० ते ५० आहे. या अहवालानंतर, लष्कराने त्या जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात ४ हजारांहून अधिक प्रशिक्षित सैनिक तैनात केले आहेत, ज्यात विशेष पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धात प्रशिक्षित सैनिकांचा समावेश आहे.


राज्यात पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी चिनाब खोऱ्यातील डोडा, किश्तवार आणि रामबन जिल्ह्यांतील आठ विधानसभा जागांसाठी तसेच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील १६ जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या