जम्मू-काश्मीरच्या बारामुला येथे ३ दहशतवादी ठार!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी काल अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने अवघ्या २४ तासांच्या आत बारामुल्ला येथे शोधमोहिम राबवून ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अजूनही काही दहशतवादी लपून बसले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.


या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. मारले गेलेले दहशतवादी आणि त्यांच्या गटाची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मीरमधील तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यातील चत्रू गावात अजूनही दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे, जिथे शुक्रवारी दहशतवाद्यांच्या एका गटाशी झालेल्या चकमकीत लष्कराचे २ जवान हुतात्मा झाले आणि २ जण जखमी झाले आहे.


जम्मू विभागातील पुंछ, राजौरी, डोडा, कठुआ, रियासी आणि उधमपूर या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये २ महिन्यांहून अधिक काळ लष्कर, सुरक्षा दल आणि नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी अचानक हल्ला करतात आणि नंतर डोंगराळ भागातील जंगलात गायब होतात या हल्ल्यांना परदेशी दहशतवाद्यांचा एक गट जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या दहशतवाद्यांची संख्या ४० ते ५० आहे. या अहवालानंतर, लष्कराने त्या जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात ४ हजारांहून अधिक प्रशिक्षित सैनिक तैनात केले आहेत, ज्यात विशेष पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धात प्रशिक्षित सैनिकांचा समावेश आहे.


राज्यात पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी चिनाब खोऱ्यातील डोडा, किश्तवार आणि रामबन जिल्ह्यांतील आठ विधानसभा जागांसाठी तसेच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यांतील १६ जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यात अनुक्रमे २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च