Pune Vande Bharat Express : पुणेकरांच्या सेवेसाठी वंदे भारत एक्सप्रेस सज्ज! 'या' तारखेपासून होणार सुरु

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशभरात अनेक मार्गांवरुन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेसचा सुपरफास्ट प्रवास पाहता पुणेकरांनी देखील वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून लवकरच पुण्यातही वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १५ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा सांगलीपर्यंतचा तासाभरात पार शक्य होणार आहे. याआधी पुणे ते सांगली प्रवासादरम्यान तीन तास लागत होते. मात्र वंदे भारतमुळे हा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वेळीची चांगलीच बचत होणार आहे.



कसं असेल वेळापत्रक?


हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हुबळीहून पहाटे पाच वाजता सुटणार आहे. ती बेळगावला सहा वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. मिरजेला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी, सांगलीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता आणि सातारा येथे १० वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल. पुण्यात दुपारी दीड वाजता गाडी पोहोचेल. पुण्याहून हुबळीला जाणारी गाडी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल, तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.



या मार्गांवरही धावणार नवीन वंदे भारत ट्रेन



  • टाटानगर - पाटणा वंदे

  • वाराणसी - देवघर वंदे

  • टाटानगर-ब्रह्मपूर वंदे

  • रांची-गोड्डा

  • आग्रा-बनारस

  • हावडा-गया

  • हावडा-भागलपूर

  • दुर्ग-विशाखापट्टनम

  • हुबळी-सिकंदराबाद

  • पुणे-नागपूर


दरम्यान, या सर्व वंदे भारत एक्सप्रेस १५ सप्टेंबर रोजी सुरु होणार असून झारखंडमधील जमशेदपूर येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत.


Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी