Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! सप्टेंबर नव्हे आता 'या' महिन्यापर्यंत करु शकतात अर्ज

जाणून घ्या काय आहे नवी डेडलाईन?


मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातच राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील महिलावर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अर्ज करण्याची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. अशातच राज्य सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख सप्टेंबर महिन्यापर्यंत होती. मात्र आता ही तारीख वाढवून नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत. त्यांना अर्ज एडिट करता येणार आहे.



असा करा अर्ज


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु केली आहे. या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे. नव्या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, याआधी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करणाऱ्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे