Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! सप्टेंबर नव्हे आता 'या' महिन्यापर्यंत करु शकतात अर्ज

जाणून घ्या काय आहे नवी डेडलाईन?


मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातच राज्य सरकारने महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील महिलावर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अर्ज करण्याची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. अशातच राज्य सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख सप्टेंबर महिन्यापर्यंत होती. मात्र आता ही तारीख वाढवून नोव्हेंबर महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत. त्यांना अर्ज एडिट करता येणार आहे.



असा करा अर्ज


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु केली आहे. या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे. नव्या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच २१ ते ६५ वयोगटातील महिला अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, याआधी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करणाऱ्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य