ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

  81

मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासासाठी सर्वात मोठे साधन म्हणजे लोकल ट्रेन. या मात्र या लोकल ट्रेनचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. मध्य तसेच हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत असून यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. मंगळवारी पहाटेपासून लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे.


हार्बर मार्गावरील नेरूळ स्थानकाजवळ पहाटेपासून लोकल रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे येथील लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.


पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल स्टेशनवरून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच पनवेल-ठाणे ही वाहतूकही विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळेसच ही वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पनवेल, बेलापूर, वाशी या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


दरम्यान, लोकलसेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन तास लागतील असे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.